Wednesday, 12 December 2012


आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त...


                              बहुआयामी कर्तृत्ववान नेतृत्व


देशातील सध्याच्या मोजक्या कर्तृत्ववान नेत्यांत आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा समावेश होतो. गेली ४५ ते ५० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण मोजक्याच नावांभोवती फिरताना आपल्याला दिसून येतं. ती नावं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, राज्याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्र पवार. या नेत्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. पवारसाहेब हे त्यांचे खरे राजकीय वारसदार. पवारसाहेबांसारख्या नेत्याला घडवण्याचं श्रेय चव्हाणसाहेबांना जातं. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात. प्रचंड लोकसंग्रह, साधी राहणी, द्रष्टेपण, माणसाची अचूक पारख, उत्तम प्रशासन हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य. 


महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवून देशाला आदर्श ठरणार्‍या कल्पक योजना, प्रकल्प राबवून चव्हाणसाहेबांनी आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं. राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात कितीही झंझावात आले तरी पवारसाहेबांनी धीरानं पावलं टाकली. आपला संयम कधीच ढळू दिला नाही. आज-काल आपल्या समाजाच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. राजकारणात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा या गोष्टी हद्दपार होतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. तात्पुरत्या यशात या दोन्ही गोष्टी टिकवून ठेवणं भल्या भल्यांसाठी अशक्य झालं आहे. यशापयशाच्या पलीकडे शाश्‍वत असते ती सभ्यता. यशवंतराव चव्हाणसाहेब अशा सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणातील मानदंड होते. पवारसाहेबांनीही ही मर्यादा कायम राखून चव्हाणसाहेबांचा वारसा खर्‍या अर्थानं पुढं चालवला आहे. 

पवारसाहेबांसारख्या नेत्याला घडविण्याचं श्रेय चव्हाण साहेबांना जातं. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात. प्रचंड लोकसंग्रह, साधी राहणी, द्रष्टेपण, माणसाची अचूक पारख, उत्तम प्रशासन हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य. त्यांचा स्वीय सहायक म्हणून काम करताना मला दीर्घ काळ त्यांचा सहवास लाभला. त्यांची कार्यशैली अभ्यासण्याची संधी मिळाली. मोजकंबोलणं, प्रश्‍नांचा अभ्यास करणं, भरपूर वाचन करणं अन् सर्व प्रकारच्या संकटांना धैर्यानं समोरं जाणं, असे पवारसाहेबांचे अनेक गुण सांगता येतील. माझ्या आगामी राजकीय वाटचालीत मला त्यातून बरंच शिकता आलं.

पवारसाहेबांनी अक्षरशः डोंगराएवढं काम उभं केलंय. न थकता सतत अठरा-वीस तास काम करण्याची त्यांची क्षमता अन्य कुठल्याही नेत्याकडं नाही. झटपट निर्णय आणि तडकाफडकी काम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करणारा नेता अशीही पवारसाहेबांची ओळख  आहे. पवारसाहेबांनी काही धाडसी पुरोगामी निर्णय घेतले. राज्याच्या कल्याणासाठी काय उपयोगाचे आहे, हा धोरणीपणा त्यामागे होता. याबाबतीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर, एन्रॉन वीज प्रकल्पाबाबत त्यांनी घेतलेले निर्णय ही मोठी उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवण्यात पवारसाहेबांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  शेतकरीहितासाठी तर ते कायमच झटत असतात. केंद्रीय कृषिमंत्रिपदाची जबाबादारी सांभाळताना त्यांनी कायमच शेतकर्‍यांच्या कल्याणार्थ पावलं उचलली. त्यांच्या पुढाकारामुळे ७१ हजार कोटींचा कर्जमाफी योजना राबविण्यात आली. त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना मिळाला. राज्यातील फळबागक्रांतीचे जनक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. राज्यातील औद्योगिकरणाला त्यांनी गती दिली. क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठीही पवारसाहेबांनी मोठं योगदान दिलंय. राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देशी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. 

महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवून देशाला आदर्श ठरणार्‍या कल्पक योजना, प्रकल्प राबवून त्यांनी महाराष्ट्राला सतत अगेसर ठेवलं. राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात कितीही झंझावात आले तरी पवारसाहेबांनी धीरानं पावलं टाकली. आपला संयम कधीच ढळू दिला नाही. अशा या बहुआयामी कर्तृत्ववान पवारसाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!






No comments:

Post a Comment